• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, April 29, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

मोर्चा तर निघणारच! घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका – आ.विनायक मेटे

आडवा आडवी केली तर आमच्याशी गाठ

Prarambh Team by Prarambh Team
June 4, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड – कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठा समाज मोर्चा काढत आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका. काहीजण समाजात दुफळी तयार करण्याचं काम करीत आहेत. त्यांना कुणीही बळी पडू नका. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी आहे. परंतु काहीजण हा मोर्चा आ.विनाक मेटे यांच्या आमदारकीसाठी असल्याच्या अफवा जाणीवपुर्वक पसरवत आहेत. परंतु मी मागेही सांगितलं आहे आणि आजही तेच सांगतोय मेटेला आमदारकी मिळविण्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न वेठीस धरण्याची मला अजिबात गरज नाही. मेटेनी मराठा समाजासाठी आतापर्यंत जेवढं काम केलं आहे त्याचे आशीर्वाद म्हणून मला आता कायमस्वरूपी आमदारकी मिळणारच आहे. हा लढा मराठा समाजातील गोरगरीबांच्या शिक्षणातील सवलतींचा, नोकरीसाठीच्या आरक्षणाचा आहे. त्यामुळे समाजाने लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे अवाहन आ.विनायक मेटे यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.


आ.मेटे म्हणाले, मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणाचा पहिला लढा ज्यांनी उभारला ते स्व.आण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे देखील नियोजनाच्या बैठका घेत आहेत. ज्यांचं बीड जिल्ह्यासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी काडीचंही योगदान नाही त्यांनी या मोर्चाला विरोध करण्याचं काम सुरु ठेवलं आहे. त्यांची ही सुडबुध्दी, आकस, परंपरा पुर्वीपासुनची आहे. खासकरून काँग्रेस पक्ष इथे कोणालाही पाठवत असून त्यांनी केविलवाणा विरोध सुरु केलेला आहे. ज्यांनी मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षण नाकारण्याचं काम केलं त्यांनी पहिली हत्या अण्णासाहेब पाटील यांची घडवून आणली. त्यानंतरही अनेकांनी या लढ्यासाठी आपलं बलीदान दिलं आहे. या सगळ्यांच्या काँग्रेसने हत्याच घडवून आणल्या. काँग्रेसने आतातरी मराठा आरक्षणाचा विरोध सोडावा. चिलटा चपाट्यांना पुढं करून अशोक चव्हाण या मोर्चाला विरोध करीत आहेत. माझं खुलं अवाहन आहे की त्यांनी समोरा समोर येऊन खुला विरोध करावा. मराठा आरक्षणात काय चुकलं याची समोरासमोर येऊन अशोक चव्हाण यांनी चर्चा करावी, मी त्यांच्या सगळ्या चुका त्यांच्या सांगतो. मात्र आपलं मराठा आरक्षण न मिळाल्याचं आपलं पाप झाकण्यासाठी ते अशा कुणालाही पुढं करून बीडमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत. मात्र समाजाने असल्या लोकांना किती महत्व द्यायचं हे ठरवून घ्यावं. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपआपल्या समाजाचं तरी भलं व्हावं यासाठी तरी प्रयत्न करा, असेही आ.मेटे म्हणाले.

आडवा आडवी केली तर आमच्याशी गाठ
मोर्चेकर्‍यांची प्रशासनाने आडवा आडवी करू नये. आम्ही प्रशासनासोबत सहकार्याची भुमिका घेत आहोत. कोरोनामुळे मोर्चेकर्‍यांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सबाबत आम्ही खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे कोणीही मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करू नये, कुणी जाणीपुर्वक मराठा आरक्षणाच्या लढ्यात आम्हाला आडवं येत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही आ.विनायक मेटे यांनी केले.

आरक्षण न मिळण्यास सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत
आरक्षण न मिळण्यास राज्य सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. जेव्हा जेव्हा न्यायालयात आरक्षणाच्या बाजुने भुमिका मांडायची वेळ आली त्या त्यावेळी आघाडी सरकारने भक्कमपणे बाजु मांडली नाही. आम्ही सगळ्यांना आजही विनंती करीत आहोत, तुम्ही कुणाच्याही सोबत येऊ नका. तुम्ही केवळ मराठा आरक्षणाच्या बाजुने या. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा एकदा हा लढा सुरु आहे. मराठा समाजाच्या इतरही अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या पुर्ण झाल्या तर समाजाला खूप मोठा फायदा होणार आहे. आज आ.विनायक मेटे बीडमध्ये पुढाकार घेत आहेत. असाच राज्यभरात त्या त्या ठिकाणचे लोक पुढाकार घेऊन मोर्चे काढतील. त्यामुळे एकटे विनायक मेटे हिरो होतील ही मानसिकता बाजुला ठेवून मोर्चात सहभागी व्हावे, असेही नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणाले.

प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाशी जोडला
मराठा क्रांती मोर्चाचा प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाशी जोडला गेला आहे. त्यामुळे कुणीही विनायक मेटे यांना नाव ठेऊ नये. आरक्षण मोर्चाचा प्रश्न कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडला जाऊ नये. जे कोणी आरक्षण प्रश्नावर विधायक मार्गाने आंदोलनाची भुमिका घेतील त्या त्या लोकांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.

 

 

Tags: EWSMaharashtra CMOMaratha ArakshanMaratha CommunityMaratha StudentsThackeray GovernmentUddhav Thackeray




Previous Post

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय | मराठा तरुणांना EWS आरक्षण मिळणार

Next Post

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
Next Post

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

बीडकरांसाठी खुशखबर! खुशखबर! | पाहा काय आहेत नवीन आदेश; वाचा जीआर जशास तसा

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात राज्यभरात काँग्रेसतर्फे निदर्शने

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात राज्यभरात काँग्रेसतर्फे निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा