बीड : जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती असताना शक्य होईल तसे ग्रामीण भागातील शाळांसाठी निधी दिला. पण पोखरीकरांनी शासनाच्या पैशाची वाट न पाहता उज्वल भविष्यासाठी शाळेसाठी लोकवर्गणी केली आणि ४० लाख रूपये खर्च करून इमारत पुर्ण केली ही कौतूकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. या शाळेसाठी भविष्यात शासकिय निधी तर मिळवून देईलच परंतु येडेश्वरी फाऊंडेशनच्या माध्यमातूनही पाच लाख रूपर्य देणगी देत आहे, अशी घोषणा खा.बजरंग सोनवणे यांनी केली.
पोखरी घाट (ता.बीड) येथे सन २०१८ मध्ये ग्रामस्थांनी इयत्ता आठवीपर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इमारतीसाठी लोकवर्गणी केली. लोकवर्गणीतून टोलेजंग अशी शाळा इमारत उभा केली असून या इमारतीसाठी दोन एकर जमीनही ग्रामस्थांनी विनंती केल्यानूसार ग्रामस्थांनी दिली. दि.२ मे रोजी जगदगुरू श्री.संत तुकाराम महाराज मंदिर वर्धापन दिनानिमीत्त त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि जंगी निकाली कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजीत केला होता. शिवाय याचवेळी लोकसहभागातून साकारलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजी केला होता. या कार्यक्रमात खा.बजरंग सोनवणे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर मठाधिपती ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे, ह.भ.प तुकाराम महाराज भारती, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ह.भ.प मारोती महाराज चोरमले, नाना महाराज कदम, सामाजिक कार्यकर्ते डॉग़णेश ढवळे, हनुमान मुळीक, राहूल वायकर, ज्ञानदेव काशीद, विकी वानी, राम फाळके यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, पोखरी घाट हे गाव छोटे आहे पण येथील लोक मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी मला मोठ्या मनाने लोकसभेत सहकार्य केलेच पण शासनाच्या पैशाची वाट न पाहता आपल्या लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी ४० लाख रूपये खर्च करून शाळा बांधली. हा आदर्श महाराष्ट्र घेईल. हे गाव ऊसतोड मजुरांचे आहे. कष्टकरी, शेतकरी यांनी राजकिय जोडे बाजूला ठेवून दाखविलेली एकजूट ही कौतूकास्पद आणि अभिमानास्पदही आहे. एक गुंठा कोणी कोणाला देऊ शकत नाही, अशा काळात येथील शेतकऱ्यांनी दोन एकर शाळेसाठी दान करणे हे दातृत्व मोठे आहे. या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळा बांधून नवा आदर्श निर्माण केला आहे. अशा ठिकाणी मी खासदार म्हणून शाळेच्या विकास कामासाठी शासकिय योजनातून मदत करेलच परंतु येडेश्वरी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रूपयाची देणगी देणार आहेत. या देणगीतून ग्रामस्थांनी आवश्यकतेनूसार खर्च करावा, असेही ते म्हणाले.
बीड : जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती असताना शक्य होईल तसे ग्रामीण भागातील शाळांसाठी निधी दिला. पण पोखरीकरांनी शासनाच्या पैशाची वाट न पाहता उज्वल भविष्यासाठी शाळेसाठी लोकवर्गणी केली आणि ४० लाख रूपये खर्च करून इमारत पुर्ण केली ही कौतूकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. या शाळेसाठी भविष्यात शासकिय निधी तर मिळवून देईलच परंतु येडेश्वरी फाऊंडेशनच्या माध्यमातूनही पाच लाख रूपर्य देणगी देत आहे, अशी घोषणा खा.बजरंग सोनवणे यांनी केली.
पोखरी घाट (ता.बीड) येथे सन २०१८ मध्ये ग्रामस्थांनी इयत्ता आठवीपर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इमारतीसाठी लोकवर्गणी केली. लोकवर्गणीतून टोलेजंग अशी शाळा इमारत उभा केली असून या इमारतीसाठी दोन एकर जमीनही ग्रामस्थांनी विनंती केल्यानूसार ग्रामस्थांनी दिली. दि.२ मे रोजी जगदगुरू श्री.संत तुकाराम महाराज मंदिर वर्धापन दिनानिमीत्त त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि जंगी निकाली कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजीत केला होता. शिवाय याचवेळी लोकसहभागातून साकारलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजी केला होता. या कार्यक्रमात खा.बजरंग सोनवणे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर मठाधिपती ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे, ह.भ.प तुकाराम महाराज भारती, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ह.भ.प मारोती महाराज चोरमले, नाना महाराज कदम, सामाजिक कार्यकर्ते डॉग़णेश ढवळे, हनुमान मुळीक, राहूल वायकर, ज्ञानदेव काशीद, विकी वानी, राम फाळके यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, पोखरी घाट हे गाव छोटे आहे पण येथील लोक मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी मला मोठ्या मनाने लोकसभेत सहकार्य केलेच पण शासनाच्या पैशाची वाट न पाहता आपल्या लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी ४० लाख रूपये खर्च करून शाळा बांधली. हा आदर्श महाराष्ट्र घेईल. हे गाव ऊसतोड मजुरांचे आहे. कष्टकरी, शेतकरी यांनी राजकिय जोडे बाजूला ठेवून दाखविलेली एकजूट ही कौतूकास्पद आणि अभिमानास्पदही आहे. एक गुंठा कोणी कोणाला देऊ शकत नाही, अशा काळात येथील शेतकऱ्यांनी दोन एकर शाळेसाठी दान करणे हे दातृत्व मोठे आहे. या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळा बांधून नवा आदर्श निर्माण केला आहे. अशा ठिकाणी मी खासदार म्हणून शाळेच्या विकास कामासाठी शासकिय योजनातून मदत करेलच परंतु येडेश्वरी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रूपयाची देणगी देणार आहेत. या देणगीतून ग्रामस्थांनी आवश्यकतेनूसार खर्च करावा, असेही ते म्हणाले.