• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, September 18, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home बीड जिल्हा आष्टी

बीड जिल्हा कर्तृत्व व विकासाची क्षमता पाहून मतदान देणार – धनंजय मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
April 29, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

मोदींजींच्या विकासाची गॅरंटी बीड जिल्ह्यात पंकजाताईच राबवू शकतात – धनंजय मुंडेंचा विश्वास


मराठवाडा तुटीचे खोरे भरून निघाल्यास बीड जिल्ह्यात किमान 42 टीएमसी पाणी येईल, ऊस तोडणारे नाही तर पिकवणारे, ही ओळख करायची आहे

आष्टी येथे धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) – कोविड सारख्या महामारीच्या काळात दोनदा नव्हे तर तीनदा समस्त देश वासियांना मोफत लस देण्यात आली. ही लस देताना कोणाचीही जात धर्म न पाहता फक्त तो भारतीय आहे म्हणून त्यांना देण्यात आली. भारत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कोविड महामारीच्या काळात अनेक इतर देशांना मदत केली. आज कोट्यावधी कुटुंबांना मोफत राशन दिले जाते, ते सुद्धा कोणाचीही जात किंवा धर्म न पाहताच दिले जाते. याही पलीकडे जाऊन मोदीजींच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. त्याच प्रकारची प्रगती व विकास बीड जिल्ह्याला अपेक्षित असून, आता बीड जिल्हा सुद्धा जात-पात धर्म या गोष्टींना थारा न देता कर्तृत्व अंगी असलेल्या व विकासाची क्षमता असलेल्या नेतृत्वालाच लोकसभेत पाठवणार आहे, असे मत राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी आष्टी येथे बोलताना व्यक्त केले आहे.

येत्या वर्षभरात केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून नगर – बीड – परळी हा रेल्वे मार्ग तर पूर्ण केला जाईलच, परंतु आणखी दोन वर्षाच्या आत याच रेल्वे मार्गावरून पंकजाताईच्या प्रयत्नातून परळी वरून मुंबईपर्यंत वंदे भारत सारखी स्पीड ट्रेन सुद्धा धावेल, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

आष्टी येथे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मोरेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास धनंजय मुंडे यांनी संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची जी गॅरंटी देशाला दिली आहे, तीच विकासाची गॅरंटी बीड जिल्ह्याला केवळ आणि केवळ पंकजाताई खासदार म्हणून देऊ शकतात; असा विश्वासही यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

मराठवाड्याचे 165 टीएमसी पाण्याचे तुटीचे खोरे भरून काढण्याचा प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे तयार असून यासाठी सुमारे एक लाख 17 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी खेचून आणण्याबरोबरच बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी केंद्रात वजन असलेला खासदार आपल्याला निवडून द्यावा लागेल. या तुटीतून सुमारे 42 टीएमसी पाणी हे आपल्या बीड जिल्ह्याला मिळणार आहे. हे पाणी आल्यानंतर बीड जिल्ह्यात मोठी जलक्रांती होणार असून याद्वारे बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र हे ओलिताखाली येईल आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत ऊस पिकवता येईल. त्यामुळे आपल्या भागातून बाहेर ऊस तोडायला जाणारा शेतकरी ऊसतोड कामगार न होता ऊस पिकवणारा बागायतदार होईल असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारच्या माध्यमातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार बीड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक, सुमारे 70 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप आतापर्यंत झाले आहे. कुणबी नोंदी शोधण्यात सुद्धा बीड जिल्हा मराठवाड्यात सर्वात पुढे आहे. सगे सोयरेचा जीआर काढण्यासाठी त्यावर आलेले आक्षेप निकाली काढून, तो मुद्दाही राज्य सरकार शक्य तितक्या लवकर निकाली काढणार आहे. त्यामुळे आम्ही व आमचे सरकार सगे-सोयरेच्या बाजूनेच आहोत, असे ठाम मतही यावेळी धनंजय मुंडे यांनी मांडले.

दरम्यान मला समोरून अनेक वेळा प्रश्न विचारले जातात की कृषिमंत्री म्हणून तुम्ही काय केले मला सांगायला निश्चितच अभिमान वाटतो की शेतकऱ्यांना पिक विमा भरायला स्वतःच्या खिशातून जो पैसा भरावा लागत होता तो मी राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे बंद केला असून आता शेतकरी केवळ एक रुपयातच पिक विमा भरू शकतो. पिक विमा बरोबरच शेतकऱ्यांना अवकाळी दुष्काळीचे अनुदान यासारख्या बाबींची ही व्यवस्था सरकारने केली. सोयाबीन व कापसाला सध्या कमी भाव असल्यामुळे जून महिन्यामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार कोटींचे पॅकेज राज्य सरकार देणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

आम्ही काय केले असे विचारणारे समोरचे उमेदवार त्यांच्या पाठीशी आम्ही सोबत राहून मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीड जिल्ह्यातून पाच लाख मते मिळवली ही पाच लाख लोक कोविड सारख्या संकटात असताना उमेदवार मात्र साखर झोपेत होते का असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. इथल्या खासदारांनी किंवा सरकारने काय केले हे विचारायला उमेदवार थेट पाच वर्षांनी एकदा येतात असा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केला.

आज समोरील उमेदवार हे जातीपातीचे राजकारण करत आहेत, त्यांनी अगदी सुरुवातीलाच स्वतःचे कुणबी प्रमाणपत्र काढून घेतले; त्यावर कोणाचाही आक्षेप नाही. मात्र स्वतःचे कुणबी प्रमाणपत्र गुपचूप काढून घेऊन त्याचा राजकीय लाभ एका निवडणुकीत घेतला, त्याऐवजी वीस – पंचवीस हजार गोरगरीब व गरजू लोकांना या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळवून दिला असता तर खरेच यांच्या मनाचा मोठेपणा आम्ही पाहिला असता असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

यावेळी आ.बाळासाहेब आजबे, मा.आ.भीमराव धोंडे यांसह मान्यवरांनी आपले मत मांडत पंकजाताई मुंडे यांना आष्टी-शिरूर-पाटोदा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर आ.बाळासाहेब काका आजबे, मा.आ.भीमराव धोंडे, डॉ.शिवाजीराव राऊत, रामकृष्ण बांगर, वणवे दादा, वाल्मिक निकाळजे, किशोर नाना हंबर्डे, साहेबराव मस्के, दीपक घुमरे, शंकर देशमुख, विश्वास नागरगोजे, बबन अण्णा झाम्बरे, विठ्ठल सानप, भाऊसाहेब लटपटे, काकासाहेब शिंदे, अजय धोंडे, लालाभाऊ खुमकर, धैर्यशील थोरवे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, पप्पू गुंड, रघुनाथ शिंदे, हरिभाऊ जंजिरे, सतीश बडे, बबनराव आवळे, प्रफुल सहस्त्रबुद्धे, असताक शेख, नाजीम शेख यांसह आदी उपस्थित होते.





Previous Post

बीड शहराच्या विकासात अमुल्य योगदान देणाऱ्या पंकजाताई मुंडेंना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार

Next Post

शेतकर्‍याच्या पोराला मतदानारूपी आशिर्वादाचे आवाहन

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

September 17, 2025
मोमीनपुरा, मौजे वासनवाडी येथे पावसामुळे मोठे नुकसान; आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

मोमीनपुरा, मौजे वासनवाडी येथे पावसामुळे मोठे नुकसान; आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

September 17, 2025
बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

September 16, 2025
जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

September 16, 2025
17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

September 11, 2025
जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

September 10, 2025
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

September 8, 2025
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

September 8, 2025
जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

September 6, 2025
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

September 3, 2025
Next Post
शेतकर्‍याच्या पोराला मतदानारूपी आशिर्वादाचे आवाहन

शेतकर्‍याच्या पोराला मतदानारूपी आशिर्वादाचे आवाहन

वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना पंकजाताई मुंडे यांनी तितक्याच मुद्देसूदपणे दिले उत्तर

वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना पंकजाताई मुंडे यांनी तितक्याच मुद्देसूदपणे दिले उत्तर

बीड शहरास पाणी पुरवठा उशिराने होणार नागरिकांनी सहकार्य करावे – नीता अंधारे

बीड शहरास पाणी पुरवठा उशिराने होणार नागरिकांनी सहकार्य करावे - नीता अंधारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आ. संदीप क्षीरसागरांनी दिले निवेदन

September 17, 2025

मोमीनपुरा, मौजे वासनवाडी येथे पावसामुळे मोठे नुकसान; आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा