• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, September 15, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

Prarambh Team by Prarambh Team
January 13, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
खा.बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप

बीड: ९ डिसेंबरला मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणातून हत्या झाली. यानंतर ११ डिसेंबर या तारखेला या हत्येशी संबधित असलेल्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यानंतर दि.१२ डिसेंबर रोजी माजी पालकमंत्री यांच्या बंगल्यावर खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यानंतर आरोपी निघून गेला, असा खळबळजनक आरोप खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या आरोपाने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

दि.१३ डिसेंबर रोजी केज येथे खा.बजरंग सोनवणे यांच्या पत्रकार परिषदेचे अयोजन करण्यात आले होते. त्याआधी खा.सोनवणे यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटूंबियांच्या आंदोलनास भेट दिली होती. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमुख, दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, दि.२८ मे रोजी या खंडणीच्या प्रकरणाला सुरूवात झाली. यानंतर २९ नोव्हेंबरला पुन्हा खंडणी मागितली. पुढे दि.६ डिसेंबर रोजी खंडणीसाठी अवादा कंपनीच्या परिसरात वाद झाला. याच वादाचा राग मनात धरून दि.९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण  खून करण्यात आला. यानंतर दि.११ डिसेंबर रोजी खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होतो. पुढे दि.१२ डिसेंबर रोजी हाच आरोपी माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक करतो आणि तिथून निघून जातो. इतकी दहशत पोलीस प्रशासनावर होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर मी पहिल्याच बाईटमध्ये मीडियाला म्हटलं होतं की, तिसऱ्या आरोपींचे कनेक्शन धाराशिवमार्गे पुण्याला लागतंय का बघा?, कारण माझ्या बोलण्यामागे काही लॉजिक होतं. पुढे हा आरोपी धाराशिवमार्गे पुण्याला गेल्याचं सापडलं. खंडणीतील आरोपी पुण्याला सरेंडर होतो. खंडणीच्या आरोपीवर ११ तारखेला गुन्हा दाखल झाला. मात्र, १२ तारखेला बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक झाली. माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या ऑफिसमध्ये खंडणीतील आरोपी अन् पोलीस अधिकारी यांची भेट झाली. हे खात्रीने सांगत आहे. म्हणजे, पोलिसाला तिथं मध्ये बसवून तो आरोपी निघून गेला का? असा सवाल बजरंग सोनवणेंनी उपस्थित केला. याच बरोबर वाल्मिक कराडला पोलिसांची सुरक्षा आहे, तो कुठल्या पदावर आहे हे मला माहिती नाही. पण, त्यांनाही पोलीस गार्ड आहेत, हे गार्ड आरोपीसोबत कसे काय? आणि आरोपी पळून जाताना पोलिस गार्ड काय करीत होते ? असे सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केले. ११ डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून आरोपीला कोणी-कोणी मदत केली. ३१ डिसेंबरला अटक होईपर्यंत २१ दिवस आरोपीला ज्यांनी मदत केली, त्यांना सह-आरोपी का केलं जात नाही, असेही खा.सोनवणेंनी म्हटलं आहे.

००

मुख्यमंत्र्यांना भेटूनही एसआयटीचे अधिकारी तेच

संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना पोलीस प्रशासनावर भरवसा राहिलेला नाही. त्यांनी एसआटीमध्ये आरोपींच्या मनावर अधिकारी नियुक्त केल्याचे त्यांना वाटत असावे, यामुळे एसआयटीतील अधिकारी बदलावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे भेटून केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण द्याल ती नावाचे अधिकारी देतो, असे म्हटले होते. परंतु अद्याप ते अधिकारी बदलले नाहीत, असेही खा.सोनवणे यांनी म्हटले.

त्यांची नावे जाहिर करा

खंडणी आणि खून हे प्रकरण एकमेकांशी संबधित आहेत. या प्रकरणात खंडणीतील आरोपींशी ज्यांचे संबंध आहेत, अशा अनेकांना एसआयटीने चौकशीसाठी बोलविले होते. त्या सर्वांची नावे जाहिर करण्यात यावीत. त्या लोकांचे आरोपींशी काय संबंध आहेत, हे लोकांना कळले पाहिजे. याच बरोबर खून आणि खंडणीतील आरोपींना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी करावे, असेही खा.बजरंग सोनवणे म्हणाले.






Previous Post

रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाबाबत खा.सोनवणेंनी घेतली चार तास बैठक

Next Post

माझ्या मुलाला न्याय द्या; वाल्मिक कराडच्या आईचे आंदोलन सुरू

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

September 11, 2025
जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

September 10, 2025
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

September 8, 2025
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

September 8, 2025
जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

September 6, 2025
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

September 3, 2025
अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

August 26, 2025
मस्साजोग प्रकरणात शासन-प्रशासनाने न्याय द्यावा- आ.संदीप क्षीरसागर

मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मुंबईला चला – आ.संदीप क्षीरसागर

August 26, 2025
ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

August 19, 2025
जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

August 15, 2025
Next Post
माझ्या मुलाला न्याय द्या; वाल्मिक कराडच्या आईचे आंदोलन सुरू

माझ्या मुलाला न्याय द्या; वाल्मिक कराडच्या आईचे आंदोलन सुरू

सामान्य नागरीकांची अडवणुक खपवून घेणार नाही नगर परिषदेच्या आढावा बैठकीत आ.विजयसिंह पंडित यांचा इशारा

सामान्य नागरीकांची अडवणुक खपवून घेणार नाही नगर परिषदेच्या आढावा बैठकीत आ.विजयसिंह पंडित यांचा इशारा

राखेच्या अवैध वाहतुकीवर प्रतिबंध घालावा – मंत्री पंकजा मुंडे

राखेच्या अवैध वाहतुकीवर प्रतिबंध घालावा - मंत्री पंकजा मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

September 11, 2025

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा