• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 12, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

भारतीय रिझर्व बँकेने मंत्री बँकेवर लादलेले सर्व निर्बंध हटवले

Prarambh Team by Prarambh Team
February 27, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

निर्बंध हटवलेली मंत्री बँक देशातील पहिली बँक, आत सर्व व्यवहार सुरळीत- अध्यक्ष डॉ. आदित्य सारडा


Beed :
रिझर्व बँकेच्या नियम व कायद्याचे योग्य रितीने पालन होत नाही, त्यामुळे ठेवीदारांचे हित बँक जोपासू शकत नाही. असा ठपका ठेवत द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प करावेत असे निर्बंध रिझर्व बँकेने लावले होते. त्यामुळे ९ मार्च २०२२ पासून ठेवी स्विकारणे, परत देणे, कर्ज वाटप करणे हे सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र बँकेने दोन वर्षाच्या कालावधीत केलेल्या योग्य नियोजनामुळे भारतीय रिझर्व बँकेने मंत्री बँकेवर लादलेले सर्व निर्बंध २६ फेब्रुवारी २०२४ हटवले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सुभाषचंद्रजी सारडा यांनी यांनी दिली. आत बँकेचे सर्व व्यवहार पुर्ववत सुरू होणार असून ज्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत हव्या असतील त्यांनी त्या परत मिळणार असल्याचेही अध्यक्ष डॉ.आदित्य सारडा म्हणाले.
या बाबात माहिती देतांना डॉ. आदित्य सारडा म्हणाले की, नविन संचालक मंडळ आल्यानंतर बँकेची परिस्थिती टप्या-टप्याने सुधारली. ३१ मार्च २०२३ रोजी रिझर्व बँकेने ज्यामुळे निर्बंध लावले होते त्या सर्व तांत्रीक बाबींची पूर्तता बँकेने केलेली. त्यामुळे मंत्री बँकेवर रिझर्व बँकेने बँकींग रेग्युलेशन ऍक्ट १९५६ चे नियम ३५ (अ) नुसार लावलेले निर्बंध काढावेत असा पत्रव्यवहार सुरू केला. यावर रिझर्व बँकेने जवळपास ४ ते ५ वेळेस विविध पद्धतीने बँकेची तपासणी केली व बँकेचे वैधानिक लेखा परिक्षक यांनी ऑडीट केले होते.
बँकेवर निर्बंधांबाबतचे पत्रय येण्यापूर्वी सहामहिणे आगोदर बँकेवर प्रशासकांची नियुक्ती होती. त्यामुळे बँकेचे जवळपास १४० कोटी रूपयांच्या ठेवी ठेवीदारांनी परत घेतल्या. निर्बंध लावण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत कोण्यत्याही ठेवीदारास बँकेने ठेवी परत देण्यास नकार दिलेला नव्हता. निर्बंध लागल्यानंतर भारतीय रिझर्व बँकेने बँकेचे लायसन्स रद्द का करू नये अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी बँकेस दिली. त्यांनी सदरील नोटीस मध्ये काढलेल्या सर्व मुद्यांची बँकेने पूर्तता करून सदरची नोटीस परत घेण्याबाबत रिझर्व बँकेच्या मुख्यालयास विनंती केली व ती त्यांनी मान्य केल्याचे अध्यक्ष डॉ.आदित्य सारडा म्हणाले. या पत्रकार परिषदेला. उपाध्यक्ष ­चितलांगे शुभम प्रदिप, संचालक गिल्डा गिरीश, डॉ. आदिती सुभाषचंद्रजी सारडा, लहाने संतोष बंजरंग,मुंडे अरुण त्रिंबकराव, पाटील अंजली भालचंद्र, वैष्णव सुधाकर देविदास, चौधरी रघुनाथ बाबुराव, खडके राहुल नंदकुमार, देशपांडे दिनेश नरहरी, शेख मोहम्मद सलीम मोहम्मद फकीर, गायकवाड राम नारायण, धारकर सतीश संपतराव, वाघ प्रल्हाद गणपत आदी संचालकांची उपस्थिती होती.
—–
भारतात एकमेव मंत्री बँक
भारतीय रिझर्व बँकेने लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देऊनही रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करून रिझर्व बँकेचे लागलेले निर्बंध उठणारी मंत्री बँक भारतातील एकमेव बँक असून यापूर्वीही बँकेने ५१, ६५, ८५ टक्के लाभांश देऊन भारतात नाव केलेले आहे.
—–
ठेवीदारांना ठेवी हव्या असतील तर तत्काळ मिळणार
६२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जून्या बँकेस कोणत्याही प्रकारचा तडा न जाता ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरून बँकेचे व्यवहार पूर्ववत सुरू होत आहेत. ज्या ठेवीदारांना आपल्या ठेवी परत हव्या असतील त्यांना त्या लगेच परत मिळू शकतात. बँकेकडे ११४ कोटी रुपयांच्या आत ठेवी आहेत. तर बँकेकडे स्वतःजवळ बँकेच्या तिजोरीत व बँकेच्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पगारी तारण वजा कर्ज होते ते जवळपास विस कोटी रूपये वसूल झाले.
—-
आज बँकेची परिस्थिती सक्षम
बँकेच्या ठेवीदारांना ठेवीचे व्याज तर चालूच होते. कत्यामुळे बँकेचे जवळपास दहा कोटी रूपयांचे नुकसान झाले. बँकेकडे मार्च २०२१ अखेर २०३ कोटी कर्ज येणे होते. ते आज ९० आहे. आज बँकेची परिस्थिती सक्षम असून रिझर्व बँकेच्या नियमा प्रमाणे बँकेचा सि.आर.ए. आर. ९ टक्के पाहिजे आज तो २१.६० टक्के आहे. तर बँकेचे नेटवर्थ ९१० लाख रूपये एवढे आहे. बँकेचे वसूल भागभांडवल रू. २० कोटी २८ लाख एवढे आहे.
——-
सारडा परिवाराची परंपरा कायम
सहकार महर्षि श्री. सुभाषचंद्रजी सारडा यांनी बीड जि. मध्यवर्ती सहकारी बँक या पूर्वी अशाच परिस्थितीमधून बाहेर काढली. ज्या बँकेत ठेवीदारांना एकहजार रूपये देखील परत करता येत नव्हते तिथे त्यांच्या चिरंजीवाने सामान्य ठेवीदारांच्या ठेवी तर परत केल्याच आणि जिल्हा परिषदेचे १२५ कोटी रूपये देखील परत दिले. नवीन कर्ज वाटपास सुरूवात केली. त्याच प्रमाणे पुढे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासक काळात बँकेवर लागलेले निबंध काढण्यास बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सुभाषचंद्रजी सारडा यांना यश आले आहे.

ठेवी वरील व्याज देखील
द्वारकादास मंत्री बँक पुन्हा मजबुद बँकेवर अलिकडच्या काळात झालेले आरोप प्रत्यारोप नष्ट करून ठेवी तर सोडाच परंतु ठेवी वरील व्याज देखील सुरक्षीत आहेत आणि बँक लवकरच कर्ज वाटप करणार आहे.





Previous Post

मुख्यमंत्री साहेब, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना जातीयवाद करण्यासाठी बीडला पाठवले का?

Next Post

परळीत धनंजय मुंडेंच्या वतीने आयोजित नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा 3 मार्चला फायनल!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
परळीत धनंजय मुंडेंच्या वतीने आयोजित नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा 3 मार्चला फायनल!

परळीत धनंजय मुंडेंच्या वतीने आयोजित नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा 3 मार्चला फायनल!

सगेसोयरे अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्टेजवर जाणार नाही

सगेसोयरे अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्टेजवर जाणार नाही

शिक्षण हे गरीबी दूर करण्यासाठीचे सर्वात मोठे साधन- आ.संदीप क्षीरसागर

शिक्षण हे गरीबी दूर करण्यासाठीचे सर्वात मोठे साधन- आ.संदीप क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा