• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 17, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही म्हणून ओरड असताना मृत्यूचे प्रमाण कमी झाले

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
April 20, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

– जाणीवपूर्वक वाढवला काळाबाजार ?


– अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) कोरोणा हे खरोखरच एक संकट आहे. यात शंका नाही. काळजी घेणे हाच एक पर्याय आता शिल्लक आहे. गेल्या आठ दिवसात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही, म्हणून रुग्ण आणि नातेवाईक ओरडत असताना दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. यावरून खरंच रेमडेसीविरची गरज आहे का ? जाणीव पूर्वक काळाबाजार वाढवला आहे का ? हा प्रश्न पडतो आहे. त्यामुळे हा विषय चिंता आणि चिंतनाचा झाला आहे, असे मत ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड.अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

रेमडेसिविर हेच इंजेक्शन कोरोणावर रामबाण इलाज असल्याचा भपका वैद्यकीय क्षेत्रात उठवला गेला. त्यातूनच काळाबाजार तेजीत आला. ज्या वेळी रुग्ण संख्या वाढत आहे, त्यावेळी वैद्यकीय क्षेत्राने असा काळा बाजार करणे किंवा काळा बाजार होण्यासाठी मदत करणे, लज्जास्पद आहे. त्याचे परिणाम या क्षेत्राला आज ना उद्या भोगावे लागतील. नियती कोणालाही माफ करीत नसते, हे या लोकांनी मान्य करायला हवे.

दिनांक १० ते १९ एप्रिल २०२१ या दहा दिवसाच्या काळात सापडलेले रुग्ण आणि कंसात मृत्यु पावलेल्या रुग्णांचा आकडा पाहिला तर हे स्पष्ट दिसते. ही आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. दिनांक १० – रुग्ण ७६४ मृत्यू (८), दिनांक ११ – १०६२ (११), दिनांक १२ – ७०३ (५), दिनांक १३ – १०१८ (९), दिनांक १४ – ९२८ (७) दिनांक १५ – ९२८ (७), दिनांक १६ – १००५ (४), दिनांक १७ – १२११ (३), दिनांक १८ – ११४५ (०) आणि दिनांक १९ – ११२१ (९) याप्रमाणे ही आकडेवारी पाहिल्यानंतर मृतांची संख्या कमी झाल्याची दिसून येते.

ही आकडेवारी आम्ही प्रशासनाकडून घेतली आहे. दररोज आपण पेपर मध्ये वाचत असलेला आकडा आणि ही आकडेवारी पाहता दोन्ही मध्ये मोठी तफावत असल्याचे दिसते. वर्तमानपत्रात आपण वाचलेली आकडेवारी जर खरी असेल तर प्रशासन ती आकडेवारी लपवून कमी संख्या शासनाला का पाठवते ? हा देखील एक गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.

रेमडेसीविर इंजेक्शन लागते की, नाही ? याबाबत आम्ही तज्ज्ञ नाहीत. मात्र रुग्णांची आकडेवारी आणि मृत रुग्णांचे प्रमाण याची तुलना केली तर जिल्ह्यात रेमडेसीविर इंजेक्शन नसताना मृत्यू कमी झाले आहेत. यावरून रेमडेसिविर इंजेक्शन ची खरच गरज आहे का ? हा प्रश्न आमच्या सारख्या सामान्य लोकांना पडत आहे. मात्र याच वेळी हे इंजेक्शन घेऊ नका, असे आमचे म्हणणे नाही. पण वास्तव समोर आणण्याचा आणि भीती कमी करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

कोरोना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कालपर्यंतची आकडेवारी पाहता चाळीस हजार चारशे चौतीस रुग्ण निघाले आहेत, तर कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या काल पर्यंत चौतीस हजार आठशे सतरा एवढी आहे. दुर्दैवाने यातील सातशे पन्नास रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाकीच्या रूग्णांवर आज रोजी इलाज चालू आहे. यावरून परिस्थिती घाबरण्या सारखी नाही, हे स्पष्ट दिसते.

ही आकडेवारी सांगण्यामागे आमचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे रुग्णाच्या मनातील भीती कमी करणे. रुग्णांनी आता रेमडेसीविरचं पाहिजे, असा विचार डोक्यात आणू नये. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राने खरोखर रुग्णसेवा करावी. जनतेमध्ये उत्साह वर्धक वातावरण निर्माण करून लूटमार थांबवावी, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

प्रशासन आता आपली काळजी घेण्यात कमी पडत आहे. किंबहुना प्रशासनाचा वैद्यकीय क्षेत्रावर आजिबात धाक राहिलेला नाही. त्यामुळे आता रुग्ण संख्या वाढू नये. कोरोना आपल्या कुटुंबापर्यंत पोहचू नये. आपल्यापर्यंत पोहोचू नये, याची दक्षता नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. आपण स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. मास्क वापरावेत, गर्दी करु नये अथवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. शासनाने घालून दिलेल्या त्रिसूत्रीचा वापर करून कोरोणा पासून दूर रहावे, असे कळकळीचे आवाहन अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.

——-
चौकट
———
* प्रशासनाचा धाक राहिला नाही
* रुग्ण आणि मृतांची संख्या पाहीली
* रेमडेसीविरचा काळाबाजार थांबवा
* जनतेने घाबरून जाणं चुकीचं ठरतंय
* स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करा
* मास्क,सॅनिटायझर वापरा,अंतर ठेवा
————-

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
चौकट
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
दिनांक रुग्ण संख्या मृतांची संख्या
१०/०४ ०७६४ ०८
११/०४ १०६२ ११
१२/०४ ०७०३ ०५
१३/०४ १०१८ ०९
१४/०४ ०९२८ ०७
१५/०४ ०९६३ ०५
१६/०४ १००५ ०४
१७/०४ १२११ ०३
१८/०४ ११४५ ००
१९/०४ ११२१ ०९
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –





Previous Post

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन

Next Post

पाहा विडिओ | 10 वीच्या परीक्षा रद्द! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post

पाहा विडिओ | 10 वीच्या परीक्षा रद्द! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

मोठी बातमी | काय सुरू? आणि काय बंद? ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे नवे नियम जारी

आज सुद्धा कोरोनाचा आकडा हजारी पार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा