• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, February 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Home ताज्या बातम्या

जनसुरक्षा विधेयक कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम – आ. संदीप क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
September 10, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडी गप्प बसणार नाही- राजेंद्र मस्के


बीड प्रतिनिधी – जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या वतीने जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात आला बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोरील चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले.
आज १० सप्टेंबर २०२५ रोजी राज्यभर निर्धार आंदोलन बीड जिल्हा पातळीवर निदर्शने
जनसुरक्षा विधेयक २०२४ – लोकशाहीस धोका महाराष्ट्र विधीमंडळात पाशवी बहुमताच्या जोरावर “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” मंजूर करण्यात आले. सरकारने नक्षलवादाचा बहाणा करून हा कायदा आणला असला, तरी या कायद्यामध्ये “नक्षलवाद” हाच शब्द नाही.प्रत्यक्षात हा कायदा सरकारला विरोध करणाऱ्या, सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या आणि शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गदा आणण्यासाठी तयार केला गेला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील नागरिक, कार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार, विद्यार्थी यांनी भाजप-महायुतीच्या विरोधात व संविधान रक्षणासाठी ठाम भूमिका घेतली. त्यांना “धडा शिकवण्यासाठी” हा कायदा आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या विधानातून उघड झाले आहे.
नागरिकांच्या हक्कांवर घाला या कायद्यामुळे :सरकारी धोरणांवर टीका करणेही गुन्हा ठरेल.
शांततामय आंदोलन – मोर्चा, उपोषण, धरणे, सत्याग्रह, संप हे बेकायदेशीर घोषित होतील.
सरकारने न मानलेले पत्रके, पोस्टर, सोशल मीडियावरील संदेश गुन्हा मानला जाईल.पोलिसांना घरात घुसून तपास, जप्ती करण्याचे अमर्याद अधिकार दिले जातील.एखादी संघटना बेकायदेशीर ठरली की तिची मालमत्ता, निधी जप्त केला जाईल.फक्त संघटनेचा सदस्य असणे, वर्गणी देणे, मदत करणे यासाठीही २ ते ७ वर्ष तुरुंगवास व लाखोंचा दंड होऊ शकतो.

जनतेचा तीव्र विरोध हा कायदा मंजूर करण्यापूर्वी संयुक्त समितीने नागरिकांकडून हरकती मागवल्या होत्या.१३,००० हरकती दाखल झाल्या.त्यापैकी ९,५०० हरकतींनी विधेयक रद्द करा, अशी मागणी केली.यापूर्वी कोणत्याही विधेयकावर इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच हरकती नोंदविल्या गेल्या नव्हत्या.तरीही सरकारने या हरकतींकडे दुर्लक्ष करून कायदा पुढे रेटला.
विद्यमान कायदे पुरेसे होते नक्षलवाद, दहशतवाद, हिंसा थांबवण्यासाठी आधीच UAPA, MCOCA व भारतीय दंडसंहितेतील कठोर तरतुदी अस्तित्वात आहेत.मग नवीन कायदा कशासाठी?
फक्त नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी, विरोधी संघटनांना बेकायदेशीर ठरवण्यासाठी आणि लोकशाहीची मुस्कटदाबी करण्यासाठी.कोणता धोका निर्माण होईल..? शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, पर्यावरण रक्षक, भ्रष्टाचाराविरोधात लढणारे सर्वजण या कायद्याच्या फेऱ्यात येतील.रायगड, गडचिरोली, मुंबईसह राज्यभरातील प्रकल्पांविरोधात बोलणे बेकायदेशीर ठरेल.
भाषिक, सांस्कृतिक प्रश्नांवर आवाज उठवणेही गुन्हा ठरेल.एकदा संघटना बेकायदेशीर घोषित झाली की तिचे सर्व सदस्य तुरुंगात जाऊ शकतात.थोडक्यात हा कायदा जनसुरक्षेसाठी नाही तर सत्ताधाऱ्यांच्या सत्तासुरक्षेसाठी आहे.
आमच्या मागण्या1.जनसुरक्षा विधेयक २०२४ त्वरित रद्द करावे.2. संविधानिक व लोकशाही अधिकारांचा सन्मान राखावा.3. शांततामय आंदोलन व सरकारवरील टीकेवर निर्बंध त्वरित थांबवावेत.आवाज दाबणाऱ्या कायद्याला ठाम विरोध करुया ! लोकशाही वाचवा – संविधान वाचवा!
यावेळी बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम भाई, माजी आमदार अँड उषाताई दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, उल्हास गिराम, परमेश्वर सातपुते, काँग्रेसचे गणेश बजगुडे, गणेश राऊत,अँड हेमा पिंपळे, संजय महाद्वार, कम्युनिस्ट पक्षाचे भाऊराव प्रभाळे, शेतकरी कामगार पक्षाचे मोहन गुंड, गणेश जवकर, खुर्शिद आलम, बाळासाहेब गोरे,गोरख सिंघन, के के वडमारे, वैजनाथ तांदळे, हांगे दादा, रतन गुजर, बाळासाहेब राऊत, शामराव तुपे, अजित काशीद, बद्रीनाथ जटळ, सह महाविकास आघाडीचे जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,सरपंच उपसरपंच, नगरसेवक सह आदी उपस्थित होते.





Previous Post

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पाठिंबा

Next Post

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

November 29, 2025
शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

November 29, 2025
गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

November 29, 2025
Next Post
17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

17 सप्टेंबरला बीड-नगर रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार : जिल्हा प्रशासन व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा…

जनावरे दगावली, पिके पाण्यात, जमिनी खरडून गेल्या; दादा, तातडीने मदत करा...

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा