आष्टी प्रतिनिधी : दर्जेदार रस्त्यांची कामे झाल्याशिवाय विकासाचा मार्ग उपलब्ध होत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली रस्ता कामे आज सुरू होत आहेत जिल्हा नियोजन व विकास निधीतून ही कामे होत आहेत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी या रस्त्याचा दर्जा चांगला राहील याकडे लक्ष द्यावे आणि सर्व संबंधित गावातील गावकऱ्यांनी देखील या रस्ता कामांवर लक्ष ठेवून चांगले काम करून घ्यावे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले आष्टी तालुक्यातील अंभोरा नांदूर आणि खरड गव्हाण फाटा येथील रस्ता शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, उद्धव बापू दरेकर,जयसिंग गव्हाणे,दत्तोबा वाडेकर, सुखदेव खकाळ, सागर आमले,संजय ढोबळे, अंकुश चव्हाण, सुखदेव खळाळ, रमेश गावडे, अनिल ढोबळे, अशोक इथापे, राजेंद्र दहातोंडे, रावसाहेब शिरसाठ,रामहरी महारनोर, उप अभियंता मधुकर निंबाळकर, शाखा अभियंता सुनील राठोड, शाखा अभियंता ढोबळे, रामेश्वर चव्हाण,मनोज थोरवे, जयसिंग गव्हाणे, रामहरी महारनोर, गोपाळ रक्ताटे,अमर वाळके,विकास अमृते,सरपंच सौ. मंगला विधाते, बलभीम विधाते, अजिनाथ विधाते,उद्धव विधाते, हे उपस्थित होते.
आमदार सुरेश धस यांनी सातत्याने पाठपुरावा करून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा निधी मंजूर करून घेतला असून 1. राष्ट्रीय महामार्ग 561 ते नांदूर 70 लाख रुपये निधी,2. राष्ट्रीय महामार्ग 561 ते अंभोरा–हिवरा — 1 कोटी 54 लाख रुपये निधी,3. प्रमुख जिल्हा मार्ग 1 ते पारोडी–बोरोडी — 3 कोटी 50 लाख रुपये निधी, 4. लोणी ते खुंटेफळ-वाटेफळ 1 कोटी रुपये निधी,या चार ही रस्ते कामांचा भव्य शुभारंभ सोमवार दि.१७ नोव्हेंबर रोजी पार पडला.शुभारंभ प्रसंगी परिसरातील पदाधिकारी, विद्यार्थी, नागरीक,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की,शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी दर्शवली
आहे. कर्जमाफी करताना २००७ पासून असलेली जुने कर्ज प्रकरणे मागे राहतात त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत या कर्जाबाबत निर्णय होणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी आपण मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले
पुढे बोलतांना आ. धस म्हणाले,रस्ता हा
दर्जेदार झाला पाहिजे अशी सर्वांनीच मागणी केली आहे. आणि त्या पध्दतीनेच हा रस्ता दर्जेदार होणार असल्याची ग्वाही आ.धस यांनी दिली. वाघळुज ते अंभोरा ह्या रस्त्याचे काम पावसामुळे दिरंगाई झाले आहे. आता लवकरच ते काम मार्गी लागणार आहे. याठिकाणी असलेल्या अंबरा या ठिकाणी पोलीस ठाणे नवीन इमारत आणि कर्मचाऱ्यांसाठी वसाहत बांधकामासाठी आठ ते दहा कोटी रुपये मंजूर होणार असून आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत लवकरच या कामास मंजुरी मिळणार आहे प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी
असून लवकरच हे काम मार्गी लागणार असल्याचे आ. धस यांनी सांगितले. माजी आ. साहेबराव दरेकर म्हणाले की, गुत्तेदारांनी हे काम कसे चांगले करील यासाठी गावकऱ्यांनी लक्ष
देण्याची गरज आहे. यामध्ये गट-तट बाजुला ठेऊन विकास कामांसाठी एकत्रित येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच सागर आमले म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित
असलेले रस्त्याचे काम आ.धस यानी मार्गी लावले पण आता संबंधित गुत्तेदारांनी हे काम
चांगले दर्जाचे करावे अशी मागणी सरपंच आमले यांनी केली. कार्यक्रमाची प्रस्तावना शाखा
अभियंता सुनील राठोड यांनी केले.
तालुक्यातील पहिली वेबसाईट असलेली ग्रामपंचायत अंभोरा
सर्व कारभार ऑनलाईन पध्दतीने सुरू असून यामध्ये अंभोरा ग्रामपंचायतीचा पारदर्शी असलेला कारभार जगभरामध्ये कोणालाही पाहता यावा यासाठी अंभोरा ग्रामपंचायतची स्वतंत्र व्यवसाय निर्माण करण्यात आली आहे सरपंच सागर आमले यांच्या पुढाकाराने वेबसाईट सुरू करण्यात
आली. त्या वेबसाईटचा शुभारंभ आ. सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आला. बिहार निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अभूतपूर्व यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार सुरेश धस म्हणाले की राजद शासन म्हणजे जंगल राज होते शहाबुद्दीन सारखा खासदार ऍसिड ची आंघोळ घालून माणसे मारत होता अशा पक्षाला लोक कसे मत देतील असे सवाल करून बिहारमध्ये जात-पात धर्मवीरहित भाजपाला मतदान झाले आहे बिहारमध्ये चांगल्या कामामुळे यश बिहारमध्ये विरोधकांच्या सभेला असलेली गर्दी मतांमध्ये बदलली नाही पण तर त्यांनी
भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांच्या आईला अपशब्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बद्दल खालच्या भाषेत प्रचार केल्यामुळे लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. बिहारमध्ये चांगल्या कामामुळे यश मिळाले असल्याचे आ.धस यांनी सांगितले.या रस्ते कामांचा झाला आज शुभारंभ राष्ट्रीय महामार्ग 561 ते नांदूर 70 लाख रुपये निधी,राष्ट्रीय महामार्ग 561 ते अंभोरा-हिवरा – 1 कोटी 54 लाख रुपये निधी,प्रमुख जिल्हा मार्ग 1 ते पारोडी बोरोडी – 3 कोटी 50 लाख रुपये निधी,लोणी ते खुंटेफळ – वाटेफळ 1 कोटी रुपये निधी, या चार ही रस्ते कामांचा भव्य शुभारंभ
आ. धस यांच्या हस्ते करण्यात आला. नांदूर विठ्ठलाचे या ठिकाणी नदीवरील उच्चस्तरीय पुलाची आवश्यकता असल्यामुळे त्यासाठी ही प्रयत्न करण्यात येतील आणि येथील प्रसिद्ध देवस्थान कपारीचा विठोबा या ठिकाणी प्रसाद या योजनेतून भावी भक्तांसाठी भक्तनिवास स्वच्छतागृह आदी सुविधा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत लवकरच या कामांना मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले तर खरड गव्हाण फाटा या ठिकाणी प्रमुख जिल्हा मार्ग एक ते पारोडी बोरुडे या रस्त्याला तीन कोटी 50 लक्ष रुपये एवढा खर्च येणार असल्याने या परिसरातील जनतेची वाहतुकीची मोठी सोय होणार आहे तसेच सीना प्रकल्प मध्ये आष्टी तालुक्यातील गावातील जमिनी जाऊन त्यांना पाणी मिळत नसल्याची खंत जयसिंग गव्हाणे यांनी व्यक्त केली त्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी सीना प्रकल्पातील बॅकवॉटर मधून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
चौकट
यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे हे नैसर्गिक संकट उद्भवले आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे वादळामुळे विजेचे पोल मोठ्या प्रमाणावर पडले असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये मिळून सुमारे 700 ते 800 पोल पडले आहेत त्यातील साडेचारशे होल चे काम उभारणीचे काम सुरू असून लवकरच बाकीचे पण उभारून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल पारोडी आणि बोरोडी परिसरातील दोन वीज उपकेंद्रांचे काम देखील लवकरात लवकर सुरू होईल असे देखील आमदार सुरेश धस यांनी सांगितले
जून 20 26 अखेर शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव भूमिगत पाईप लाईन चे काम पूर्ण होऊन या पाईपलाईन द्वारे खुंटेफळ साठवण तलावामध्ये पाणी सोडण्याचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न चालू आहे अशी माहिती ही आमदार सुरेश धस यांनी दिली
















